Sunday, March 6, 2016

पप्पांचे व्हाटसप!! पप्पांचे फेसबुक!!


" चार दिवस झाले, यामी नीट  खात नाही, पीत नाही, निट बोलत नाही. परीक्षा चालू आहे, पण अभ्यासात तिचे  मन लागत नाही. आज मी तिला संध्याकाळी विचारते काय झाले आहे नक्की?  अशी का वागतेस?  आता आठवीत गेली, मोठी झाली, शाळेत कोणी ओरडले, कोणी मुलानी वगैरे काही त्रास तर दिला नाही तिला?  " आपल्या  मुलीबद्दल असे असंख्य विचार इशाला सतावत होते वं  ऑफिसच्या कामात तिचे मन लागत नव्हते.

संध्याकाळी घरी आल्यावर, यामी आणि इशा चहा घेत होते तेव्हा ईशाने ठरवल्या प्रमाणे विषय काढाला, "हे बघ यामी,  आत्ता घरात फक्त तू आणि मी आहोत, तुझ्या मनात नक्की काय चाललय, मला कळू दे. आई आहे मी तुझी मला सांग. मन मोकळे कर. नेहमी बडबड करून मला, दादाला आणि पप्पांना सतावणारी यामी कुठे हरवली आहे का? इतकी शांत का? मला त्रास होतोय बाळा. दादा आणि पप्पा घरी नाहीत तू मला आत्ताच सांग काय कारण आहे?"

यामी थोडा वेळ नजर खाली टाकून शांतच राहिली. मग थोड्यावेळाने तिने आपल्या आईकडे अश्रू पुसत आपल्या शांततेचं  कारण सांगू लागली "आई पर्वा  मी पप्पांचा मोबाईल घेतला होता, आता मला कळले ते मला मोबाईलला हात का लावू देत नाही…. " एवढे म्हणून ती अजून रडू लागली.

"अगं  यामी, शांत हो !! काय बोलायचं पूर्ण बोल घाबरू नकोस." इशा ने तिला बोलण्यासाठी प्रोस्त्साहित केले.

"मी पप्पांचे वॉट्सप (watsapp ) पाहिले त्यात एका स्त्रीचे  खूप घाण चित्रीकरण होते. पण  त्यामुळे  मी इतकी दुखावले गेले, पप्पांनी त्या चित्रावर लिहिलेल्या घाण टीका वाचून मला घृणा आली आहे. एवढेच नाही आई,  मग मी कुतूहल म्हणून  पप्पांचे फेसबुक(facebook ) पण पहिले, त्यात पण पप्पांनी अनेक स्त्रियांशी घाण गप्पा मारल्या आहेत." एवढे बोलून ती हुंदका देऊन रडू लागली,  " मला पप्पांची घाण वाटतेय. मला राग आलाय. काय करू मी? अभ्यासाला बसते  तेव्हा पण हेच डोक्यात येते, आपले पप्पा असे आहेत. शी!! आत्ताच्या परिस्थितीत मुलींना सुरक्षित कसे ठेवावे या विचाराने  प्रत्येक बापाचे हृदय धडधडत असेल ना? पण माझे पप्पा असे का वागले? ते माझे रक्षण करू शकतील ना? जर त्यांचेच विचार इतके हीन आहेत, तर मी या समाजात असलेल्या प्रत्येक पुरुषाकडून काय अपेक्षा करू? आई, शाळेतून येता जाता अनेक पुरुष माझ्या समोरून जातात, कुणाचे डोळे तर कुणाचे हात रोजच माझ्या शरीराचा मला राग येईल अशी हरकत करत असतात, पण मी नजर अंदाज करते आणि मुकाट्याने सहन करते, कारण त्या पुरुष म्हणवून घेणाऱ्या पुरुषांशी माझा काही एक संबंध नाही. पण पप्पांना मी कसे नझर अंदाज करू? त्यांना कसे विचारू? " इतके बोलून यामी ढसा- ढसा  रडू लागली. तिच्या मनावर परिणाम झाला होता.

 ईशावर यामीच्या  प्रश्नांची वीज कोसळली होती. ती निरुत्तर झाली होती.

खरच  या टेक्नोलोजीच्या युगात, आपल्या विचारांना, वागण्याला आता काही कुंपण राहिले नाही, टचस्क्रीन वर टच  करून  आपण रोज अनेक विनोद, विचार, चित्र , एक मेकांशी वाटतो, पण आपल्या आजू बाजूला असलेल्या व्यक्तींच्या मनाला स्पर्श होईल असे वागतोय का? याचे सुद्धा भान ठेवले पाहिजे.