Sunday, March 8, 2015

"स्त्री- पुरुष समानता" - सिद्ध करणाऱ्या काही बायकांना सलाम

आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे तेव्हा आपण आजच्या दिवस अश्या महिलांना आठवूया ज्या खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने काम करून राबून आपल्या दैनंदिन घडामोडीत आपली मदत करीत असतात. या स्त्रियांना उच्च शिक्षण घ्यायची संधी मिळाली नसेल, त्यांना विकसित शहरातल्या स्त्रीयान्सारखे नीट- नेटके कपडे घालून, सौंदर्य प्रसाधने लाऊन वावरता येत नाही, परंतु तरीही त्या स्त्रियांचे आपल्या कामात नकळत होणारे योगदान उल्लेखनीय आहे. 

१. शेतीत मजुरीचे काम करण्याऱ्या बायका,  त्यांच्या अमाप कष्टाने त्या आपले घर चालावितातच पण आपल्याला अन्न पुरवितात.

२. मंडई मध्ये भाजी किव्वा मच्छी  विकणाऱ्या बायका



३. बस आणि रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करून प्रवास्यांना सुखरूप त्यांच्या ठिकाणी पोचवणाऱ्या  महिला चालक. 


४. आपल्या घरात काम करणाऱ्या बायका, त्यांचा कामात हातभार असल्याशिवाय आपली रोजची धावपळ आटपणार नाही. 





Wednesday, March 4, 2015

भुताची गोष्ट


एका खेड्यात नुकतेच रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु झाले होते, रस्त्याच्या  बाजूला
लागून एक खूप वृद्ध वडाचं  झाड होतं, त्याच्या फांद्या, पारंब्या इतक्या मोठ्या होत्या कि वाटेत पडद्या सारख्या लोंबकळू लागल्या होत्या.  रात्री तर त्या वाटेवर गाडी घेऊन लोक जात नसत कारण गाडी चालवणाऱ्या माणसांचे अपघात वाढू लागले होते.  मागच्या महिन्यापासूनगावात त्या वडाच्या झाडाबद्दल गावात खूप चर्चा होती. लोकांचे म्हणणे होते की, ह्या वडाच्या झाडावर एक खूप वाईट भूत राहते, ते खूप विचित्र दिसते, रंगाने काळे-कुट्ट, केसांच्या जटा मोठाल्या, संपूर्ण चेहऱ्यावर पसरलेल्या, रात्री बारा नंतर दोन-चाकी गाडीवर जाणाऱ्या माणसांना अचानक ते भूत दिसायचे आणि ते पडून जखमी व्हायचे. पण भुताने आज पर्यंत कोणाला इज केली नव्हती. लोक घाबरून गेले होते, त्या वडाच्या झाडाजवळ सुद्धा जायला तयार नव्हते. गावाच्या सरपंचाने खूप उपाय केले, आधी पारंब्या कापल्या पण तरी अपघात काही कमी होईना, मग झाडाची फकीर, बाबा बोलावून पूजा, शांती वगैरे करून घेतली तरी काही फरक पडला नाही. लोकांना त्या भूताचे दर्शन व्हायचेच. लोकांनी त्या झाडाजवळ जायचे बंद केले, पारंब्या कापायला सुद्धा माणसं  मिळत नव्हती, इतके ते झाड प्रसिद्ध झाले होते. 

एका रात्री त्या गावच्या सरपंचाने आणि लोकांनी ठरवले आज या गोष्टीचा उलगडा करायचाच. जाळी, हत्यारे घेऊन एकदम जय्यत तयारी करून, काही लोकं  बाराला त्या झाडाच्या आजू बाजूला लपून उभी राहिली. थोड्या वेळाने एक माणूस ठरवल्याप्रमाणे दोनचाकी  गाडी घेऊन आला. ते भूत झपाट्याने खाली उतरले, आणि गाडी समोर जाऊ लागले, लोकांनी लगेच जाळी टाकून त्याला पकडले, आणि तिथेच बांधून ठेवले. सगळी माणसं त्याच्या भवती गोळा झाली आणि त्या भुताला जवळून पाहू लागली, तो खंडू नावाचा गावातलाच शाळकरी तरुण मुलगा निघाला, सगळे खूप रागावले होते त्याला पाहून त्याला मारू लागले. सरपंचाने सगळ्यांना शांत व्हायला सांगितले आणि त्याला विचारले, " काय  रं पोरा, यो कशापाई केलं?आरं, तुझ्या बापाचाच मळा यो, यो झाड, तुझ्या बाबाने(आजोबाने) लाविलं  व्हतं , कशा पाई सांग?" 

खंडू रडतच सांगू लागला, " मला माफ करा!! मी चुकलो!!…. माया बाबानं (आजोबाने) यो वडाचं झाड लाविलं  व्हतं, तो म्हातारा म्येला पन ह्यो झाड तो आपल्याला देऊन ग्येला, मागल्या महिन्यात एका सरकारी माणसाने बापाला पैसा चारला, त्याला ह्यो झाड कापायची परवानगी  पायजे व्हति. यो झाड पुढल्या महिन्यात तोडायला हवं , इथं  रस्ता रूंद करायचं सांगत व्हता  माया बापाला, बापानी दम दिला व्हता कुनाला सांगितला तर मला आनि आईशीला मारून टाकेल, मला लाई ब्येकर वाटलं, मी ठरवलं  झाडाच्या आस पास पन कुनाला वावरू द्येनार न्हाय. म्हनून मी यो असा वागलो, काळे कपडे आणि खोटे क्येस लावून लोकांना भीती घालाया लागलो,  मला माफ करा!"