Saturday, November 30, 2013

पेंटिंग चे प्रयत्न

पेंटिंग चे प्रयत्न

                                                    fabric  पेंटिंग कपड्यावर - उशीचा आबरा



fabric पेंटिंग  कॅनवासवर  वारली पेंटिंग - वॉल पीस 


वेस्ट रिसायकल- घरगुती उपयोग


वेस्ट  रिसायकल- घरगुती उपयोग 



कुकरच्या  बॉक्सचा खेळ ठेवायला वापर केला आहे 

पाण्याच्या वं दुधाच्या कॅन्स चा असा वापर करू शकतो 




Monday, November 25, 2013

नवरा बायको- एक मजेशीर नाते- एक सुनेहरी आठवण

नवरा बायको- एक मजेशीर नाते- एक सुनेहरी आठवण

सगळ्यात अजब नाते म्हणजे नवरा बायको चे. या नात्यावर किती विनोद केले जातात. किती विचित्र आहे हे नाते. रक्ताचे नाते नसले तरी काही वर्षातच ते इतके दृढ होत जाते.



रस्त्याने एक आजी आजोबा चालले होते. त्यांचाकडे पाहून वाटत होते की आजी आजोबांना सांगत होती " तुम्हाला आठवतेय का मी तुम्हाला असे सांगितले होते? "  आणि ते आजोबा आपली मान डोलवत " हो हो " म्हणत होते. खरच या नात्याची गम्मत म्हणजे नवरा निमुटपणे नेहमी बायकोचे म्हणणे ऐकत असतो. 

आपण नेहमी त्याला  तकरारी सांगत असतो पण तो बिचारा ऐकून घेत असतो. कधी कधी चूक आपलीही असते तरीही तो आपलीच  बाजू घेत असतो. हेच आहे आपल्यावरचे प्रेम, पण आपण तरीही त्याच्या प्रेमावर संशय घेत राहतो. पण हा आपला स्वाभाविक गुणधर्म आहे का? म्हणजे नवऱ्यावर निस्सिम  प्रेम करतो म्हणून आपण ही चूक सारखीच करत राहतो. ह्या नात्यात किती गोडवा आहे. खूप मजेदार आहे हे नाते. कधी आपण या नवऱ्यावर  विजेसारखे कोसळतो तर कधी त्याला एका लहान बाळासारखे प्रेमही करतो. नवराही तसेच वागतो, कधी आपले खूप लाड करतो, तर कधी नकळत आपले मन दुखवतो.  

लहानपणी आजी आजोबांचे एकमेकांवरचे प्रेम पहिले होते. खूप भांडायचे दोघे, पण तरीही एक मेकांशिवाय जेवण सुधा नाही जायचे त्यांना  आजोबा खूप सक्त आणि बोलण्यात बेभान होते, आजीला खूप टोचून बोलायचे पण तरीही आजोबांच्याच आवडीचे जेवण आजी बनवणार, त्यांना अगदी सगळे हातात आणून देणार. ती सुधा आमच्या जवळ त्यांची तकरार करायची. पण खूप गोड होते ते नाते. 

आई बाबा पण किती भांडत असतात, म्हणजे लहानपणापासून असा एकही आठवडा गेला नाही की त्यांचे भांडण झाले नसेल. पण आई कधी  आजोळी गेली, किव्वा कुठे बाहेर गेली की बाबांचे सारखे तिला फोन. त्यांना कर्मत नाही तिच्याशिवाय. 

नवीन नवीन लग्नानंतर एकदा आम्ही ऑफिस सुटल्यावर बाइक वरून घरी जात होतो आणि अचानक काही कारणाने संतोष - माझा नवरा माझ्याशी उगाच वाद करायला लागला, मला कळेच न याला काय झाले. घर जवळ आले तसे त्याने अजून जास्त वाद घालायला सुरुवात केली. मग मी पण काही सोडले नाही वाद घालायला, शेवटी त्याने बाइक थांबवली आणि मला खाली उतरवले. मी सुद्धा अगदी अभिमानाने किव्वा स्वाभिमानाने लगेच खाली उतरले आणि घराच्या दिशेने चालू लागले. मला खूप आश्चर्य आणि वाईट वाटत होते. हा असा का वागतोय?  काय झाले याला? मग मी घरी गेले तर अजूनच चीड आली मला. तो मस्त सोफ्यावर अडवा होऊन टीवी बघत होता, वर मला order  सोडू लागला - पाणी आण, चहा आण, काही खायला दे- वगैरे वगैरे. मला खूप त्रास होत होता आता. पण मी विचार केला कि काही बिनसले असेल कुणाशी आणि आपल्यावर राग काढतोय म्हणून निमुटपणे त्याचे ऐकत होते. मग माझे किचन मध्ये ओट्यावर लक्ष्य गेले तर एक सुंदर बॉक्स  गिफ्ट pack करून ठेवला होता. त्यात सुंदर सोन्याचे कानातले आभूषण होते, आणि मग मला कळले की हा असे का वागतोय. हे लग्नानंतरचे पहिले सरप्राइस गिफ्ट होते. खूप छान होता तो क्षण. मग त्याने कबुल केले की यासाठी तो इतके वाईट वागला आणि मला खाली उतरवून घरी लवकर येउन त्याने हे सरप्राइस अरेंज केले. 



Saturday, November 16, 2013

आपण सगळेच एकटे आहोत

आपण सगळेच मनाच्या एका कोपऱ्यात एकटे आहोत का?

आई, बाबा, भावंड, नवरा, बायको, मुलं, नातेवाईकांच्या घोळक्यात, मित्रांच्या- मैत्रिणींच्या टोळीत, कधी नं कधी कुठेतरी आपण एकटे आहोत ना?

आपण जगाला का भुरळ पडतोय कि आपण एकटे नाही आहोत, आपण खरच एकटे आहोत. 

आई बाबांच्या, भावंडांच्या भांडणात,
जरी रक्ताची नाती आहेत तरी आपण एकटे आहोत. 

नवरा बायको जरी जगासाठी एक आहेत तरी ते एकटे आहेत,
आतल्या आत कुठे तरी ते वेगळे आहेत. 

पोरं बाळं  झाली तरी आपण एकटेच आहोत,
ती मोठी झाली की त्यांचे मार्ग पकडणार. 

मित्र मैत्रीण बदलत राहणार, शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरी मध्ये  कायमस्वरूपी कोणी नाही, 
आज इथे उद्या तिथे, एक ठिकाण नाही, जग बदलते तसे ते ही बदलणारच. 

राहिले कोण? आपण स्वतः का?
पण आपण तरी आपले आहोत का? या जगासाठी स्वतःला  बदलतोय, जगाच्या गतीने चालायचा प्रयत्न करतोय, स्वतःच्या गतीने नाही. 





Thursday, November 14, 2013

चकली भाजणी सूप

चकली भाजणी सूप

दिवाळीनंतर चकली भाजणी  उरली तर काय?

त्याचे थालीपीठ होते. पण थालीपीठ सगळ्यांनाच नाही आवडत. तर एक नवीन मेनू आपण ट्राय करू शकतो.
चकली भाजणी सूप. अतिशय पोषक, आणि चविष्ट.  आपण यात आपल्या आवडीप्रमाणे कितीही भाज्या टाकू शकतो .



साहित्य

५-६  टेबलस्पून चकली भाजणी
१ चिरलेला कांदा
१/२ किसलेले किव्वा बारीक चिरलेले गाजर
१ टोमाटो बारीक चिरलेला
२ चमचे तेल
१-२ लसुन पाकळी बारीक चिरलेली
१/२- १ लिटर पाणी
मीठ चावी पुरता
हळद
कोथिम्बिर
१ मिरची

कृती

१. एका पातेल्यात पाणी आणि भाजणी एकत्र करावे. गाठी सोडवून घ्यावा
२. काढीत तेल गरम करावे आणि त्यात लसुन पाकळी, मिरची, कांदा परतून घ्यावा.
३. मग त्यातच टोमाटो, गाजर परतुन घ्यावे. हळद टाकावी.
४. भाज्या परतल्यावर त्यात  पाणी आणि भाजणी चे मिश्रण ओतावे. चावी पुरता मीठ टाकावे.
५. त्याला चांगली उकळी येऊ द्यावी. शिजू द्यावे.
६. सूप घट्ट होई पर्यंत उकळावे.
७. गरमागरम सूप बाउल मध्ये सर्वे करताना मस्त त्यावर कोथिम्बिर ने गार्निश करावे.


Tuesday, November 12, 2013

वेस्टर्न एक्स्प्रेस थोडी हळू जाईल आणि येताना फक्त चांगले आदर्श घेऊन येईल का?

एकदा वसई ला आई बाबा आणि बहिणी बरोबर एका हॉटेल मध्ये जेवायला गेले होते.  हॉटेल च्या बाहेर अचानक बाबांना ऑफिस मधले  एक जुने मित्र भेटले.  त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी आणि मुलगा पण उभे  होते. वयाने दोघेही लहान होते, मुलगी कॉलेज मध्ये आणि मुलगा शाळेत शिकत असावेत. होते तितका वेळ तोंडात सतत चिंगम चघळत होते दोघेही. बाबांशी ओळख करून देताना सुद्धा ती दोघेही चिंगम चघळत मिश्किलने हसत बाबांकडे पाहत होती. आम्हाला थोडे  विचित्रच वाटले हे वागणे. आम्ही निघालो तिथून लवकरच, नंतर आमच्यात हीच चर्चा झाली कि किती बेशिस्त आहे हि आजची पिढी. नमस्कार चमत्कार किव्वा हाय सुद्धा नाही केला त्या दोघांनी. किती बदल झाला आहे पुढच्या पिढी मध्ये. हीच ती सो कॉल्ड  नवीन पिढी आहे का? काय आहेत यांचे आचार विचार? हि पिढी स्वार्थ, कपट आणि किती उद्धट  विचारांनी घडवली गेली आहे. यांचात आपल्यासारखे  शिष्यत्व, बालिशपणा  का नाही राहिला? पण यांना घडवले कोणी? नंतर तिथेच टीवीवर बलात्कार ची बातमी झळकली त्यात बलात्कारी होते सगळे अल्पवयीन. आमच्या चर्चेने अजून वेगळे वळण घेतले. आजकाल बलात्कारांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. आश्चर्य याचे वाटते कि बलात्कार करणाऱ्यांमध्ये आता अल्पवयीन शालेय, कॉलेज चे विद्यार्थी पण सामील होऊ लागले अहेत.  हे का घडतेय? कोण आहे याला जबाबदार?


वसईत घराजवळ एक नावाजलेला कोचिंग क्लास आहे. त्या क्लास च्या बाहेर नेहमी शालेय विद्यार्थी उभे असतात. त्यात जास्तीत जास्त प्रमाण ८वी  ते १०वी  मधल्या मुलांचे असते. हि सगळी पोरं पोरी  घोळक्यात उभी असतात. जवळ जवळ ८० टक्के मुलांच्या हातात मोबाईल किव्वा स्मार्ट फोन असतोच. त्यांचे कपडे, त्यांचे वागणे, बोलणे हे सगळे अगदी टीवी वर असलेल्या जाहिराती , कार्यक्रम आणि नवीन सिनेमाने प्रभावित असते  हे लगेच आढळते. आजच्या ह्या पिढीला पाश्चात्य संस्कृती कडे ओढून नेणारे सगळ्यात मोठे श्रय हे टीवी वर च्या जाहिराती आणि सिनेमा मध्ये वाढलेल्या अशलीलपणालाच दिले पहिजे. त्याच मुळे भारतात सध्या च्या युगात व्यभिचार, लैंगिक शोषण आणि बलात्कार सारख्या घटना सारख्या घडू लागल्या आहेत.  

टीवी वर च्या  अनेक जाहिरातींमध्ये ते विशिष्ठ उत्पादन हे पुरुष वं  स्त्रिया एकमेकांना आकर्षित करण्या करिता वापरू शकतात असे स्पष्ट पणे दर्शवले जाते. उदाहरण घ्यायचे झाले तर dio स्प्रे, टूथपेस्ट, पावडर चा वापर पुरुष वं  स्त्रीया एकमेकांना आकर्षित करायला वापरावे असे त्यांच्या जाहिरातीत दर्शवले आहे, कॉलेज मध्ये किव्वा शाळेत मुलगा मुलीला चॉकलेट देऊन तिला आपल्या जवळ करू शकतो,  स्त्रियांनी सौंदर्य प्रसाधने केवळ पुरुषांना घायाळ करायला वापरावी, नीट नेटके राहायला नव्हे. गर्भनिरोधाकांच्या जाहिराती खुलेआम दिवसभर दर्शवल्या जातात, आणि अगदी स्पष्टीकरणा सकट, काही जाहिरातींमध्ये तर चक्क अशालील घाण चलचित्रांचा वापरही केला जातोय. म्हणजे एकंदर तुम्ही जे काही कराल वापराल, त्याचे उद्देश्य एकच आहे ते म्हणजे आकर्षण असे या नवीन पिढी ला  सांगायचे असते का जाहिरातीतून. 

यंदा शालेय नवतरुणींवर हॉट pant आणि अर्धांग उघडे ठेवणाऱ्या कपड्यांचा  खूप प्रभाव आहे. सिनेमातल्या ताराकांसारख्या बिनधास्त आणि सुंदर राहण्याचा तंतोतंत  प्रयत्न करतात. पण असे कपडे घालण्यामागची  त्यांची नक्की  काय भावना आहे  हे आधी त्यांनी ठरवावे. "मुलाच्या बरोबरीने आम्ही सुद्धा बर्मुडा घालणार अंगाचे प्रदर्शन करणार "अशी भावना आहे का? कि आपले पाय शरीर किती सुंदर आहेत हे त्यांना दाखवायचे आहे? मुलगी आणि मुलगा हे सगळ्या दृष्टीने बरोबरीचे आहेत त्यात काही वाद नाही. पण निसर्गाच्या दृष्टीने त्यांच्यात काही प्रमाणात फरक तर आहेच. आणि तो आपण नाकारू नाही शकत . 

हे सगळे टीवी, आणि नवीन सिनेमे यांचेच तरुण पिढीला दिलेले आदर्श अहेत. आपण ज्या पिढीत होतो ती नशीबवान होती आणि आपल्या आई वडिलांची तर अजूनच नशीबवान होती. पाश्चात्य संस्कृती मध्ये विलीन होत चाललेली ही पिढी आपले संस्कार, आपली हिंदू संस्कृती विकून आपल्या देशाला काय भविष्य देणार काय माहिती. आपल्या सुंदर पुरातन संस्कृतीचे स्थानक सोडून हि वेगवान वेस्टर्न एक्स्प्रेस थोडी हळू जाईल आणि येताना फक्त चांगले आदर्श घेऊन येईल का?